Q. मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतातील राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते?
1) 31
2) 14
3) 32
4) 30
(सोलापूर ग्रामीण चालक 2023) (हा प्रश्न आत्तापर्यंत 10 पेक्षा अधिक वेळा विचारला आहे.)
Answer: (3) 32
स्पष्टीकरण –
- कलम 32 चा उद्देश मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी हमी युक्त, प्रभावी, जलद गतीने, कमी खर्चात व संक्षिप्त उपाय योजना उपलब्ध करून देणे हा आहे.
- नागरिकांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास ते त्यांना न्यायालयाकडून पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी घटनेत उपाययोजना करण्यात आली असल्याने या हक्काला ‘घटनात्मक उपाय योजनेचा हक्क’ असे म्हणतात.
- कलम 32 अंतर्गत प्राप्त हक्क बजावण्यासाठी आधी मूलभूत हक्कांचे उल्लंघन झालेले असणे ही एक पूर्ववत अट आहे.
- घटनेतील गैर मूलभूत हक्क वैधानिक हक्क, प्रथाजन्य हक्क इत्यादींना संरक्षण कलम 32 अंतर्गत प्राप्त नाही.